सर्वसमावेशक, निर्व्यसनी आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार—चर्चेच्या केंद्रस्थानी व्यंकटेश देशमुख
सर्वसमावेशक, निर्व्यसनी आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार—चर्चेच्या केंद्रस्थानी व्यंकटेश देशमुख
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर चिचोंली (माळी) जिल्हा परिषद सर्कलमध्ये यंदा बदलाची लाट दिसत असून, या सर्कलमध्ये नवीन, प्रामाणिक आणि सामाजिक भान असलेले नेतृत्व म्हणून मा. व्यंकटेश ज्ञानोबाराव देशमुख (माजी सैनिक) हे नाव विशेष चर्चेत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून प्रस्थापित नेत्यांचे वर्चस्व असलेल्या या सर्कलमध्ये यावेळी सर्वसामान्य मतदार नवीन चेहऱ्याकडे पाहत असल्याचे चित्र आहे. देशसेवेचा वारसा, समाजकार्यातील सातत्य, स्वच्छ चारित्र्य आणि लोकसंग्रह यामुळे व्यंकटेश देशमुख जनतेच्या हृदयात स्थान मिळवताना दिसत आहेत.
“वसा देश सेवेचा… आता समाज सेवा”
भारतीय सेनेत तब्बल २२ वर्षे कर्तव्यपर सेवा बजावल्यानंतर सेवा निवृत्त झालेल्या देशमुखांनी तीन वर्षांपासून समाजकार्यात स्वतःला वाहून घेतले आहे.
गोरगरीब, शेतकरी, कामगार, विद्यार्थी, मजूर यांच्या विविध प्रश्नांवर त्यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून अनेकांना न्याय मिळवून दिला आहे.
विद्यार्थी, शेतकरी व सर्वसामान्यांसाठी पुढाकार
एमपीएससी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अडथळे, स्कॉलरशिप विषयक अडचणी, शेतकरी वर्गाचे प्रश्न—प्रत्येक मुद्द्यावर त्यांनी समाजाबरोबर राहून लढा दिला आहे.
ज्ञानपुष्प मैत्री फाउंडेशन चे अध्यक्ष म्हणून, अतिवृष्टीग्रस्त भागात मदतकार्य, गरजूंसाठी किराणा किट वाटप, विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन अशा अनेक उपक्रमांद्वारे ते सतत सामाजिक बांधिलकी जपत आले आहेत.
उच्चशिक्षित व प्रामाणिक प्रतिमेचा तरुण नेता
सैनिक सेवेबरोबर शिक्षण सुरू ठेवत त्यांनी—
- बीएस्सी – डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ
- बीए – यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ
- बीएड – मिलिटरी कॉलेज
अशी पदवी प्राप्त केली असून ते सध्या कायद्याचे शिक्षण (LLB) घेत आहेत.
उच्चशिक्षित, अभ्यासू, शिस्तबद्ध आणि निर्व्यसनी नेतृत्व अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली आहे.
भूमिपुत्र, लोकसंग्रही आणि विकासाभिमुख दृष्टिकोन
मूळचे वरपगावचे रहिवासी असलेले देशमुख पुण्यात युवा उद्योजक म्हणूनही परिचित आहेत. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित, सर्वसमावेशक दृष्टिकोनातून काम करणारा स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार म्हणून त्यांचा उल्लेख होत आहे.
चिचोंलीत बदलाची मागणी — देशमुख आघाडीवर
गेल्या अनेक कार्यकाळांपासून एकाच राजकीय घराण्याचे वर्चस्व असल्याने यंदा मतदारांचा कल नवीन नेतृत्वाकडे झुकत असल्याचे चित्र दिसत आहे.
“सर्वसमावेशक विकासासाठी स्वच्छ नेतृत्व हवे, आणि त्यासाठी व्यंकटेश देशमुख सर्वोत्तम पर्याय”
— अशी सर्वसामान्य मतदारांची भावना व्यक्त होत आहे.
चिचोंली जिल्हा परिषद सर्कलमध्ये त्यामुळे एकच नाव सध्या सर्वाधिक चर्चेत—
मा. व्यंकटेश देशमुख.

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





