महाराष्ट्रशहरशिक्षण-प्रशिक्षण

दत्तक पालक योजना म्हणजे मूल्यांची पेरणी….. डॉ.श्रीपाल सबनीस


दत्तक पालक योजना म्हणजे मूल्यांची पेरणी….. डॉ.श्रीपाल सबनीस

सांगवी:- सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजनेअंतर्गत वितरित केले जाणारे पैसे हे केवळ पैशाचे वाटप नसून, ती मूल्यांची पेरणी आहे. सावित्रीबाई फुले यांनी ज्ञानदानाचे कार्य केले, ज्ञान हे मानवी जीवनातील दुःखावर फुंकर घालण्याचे काम करते. आगरकर, रानडे,फुले दांपत्य,आंबेडकर आणि महात्मा गांधी या साऱ्याच महामानवांनी स्त्रीमुक्तीचे महान कार्य केले. त्यांना मी वंदन करतो. असे विचार ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले जुनी सांगवी येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सांगावीच्या सर्व शाखांच्या वतीने आयोजित सावित्रीबाई फुले दत्तक पालक अर्थ वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. शाळा प्रमुख शिवाजीराव माने यांनी मला याच कार्यक्रमात 2018 साली बोलवले होते. तेव्हा त्यांनी दोन लाख 50 हजार रुपये असे एकूण 250 मुलींना प्रत्येकी 1000 रुपयाचे अर्थ वितरण केले होते. त्यावेळी मी माझ्या भाषणात असे म्हणालो की भविष्यात पाच लाख रुपये जमा केल्यानंतर या कार्यक्रमास मी पुन्हा येईल, आज पाच लाख 68 हजार रुपयांचा टप्पा पार करून 568 मुला मुलींना प्रत्येकी 1000 रुपयाचे अर्थ वितरण केले आहे.त्यांनी माझा शब्द झेलला, याबद्दल मी सर्व शिक्षकांचा कृतज्ञ आहे.या सर्वांचे नेतृत्व करणारा मुख्याध्यापक श्री शिवाजीराव माने हा ध्येयवेडा शिक्षक आहे, त्याचे सर्व शिक्षक टीमही ध्येयनिष्ठ शिक्षक म्हणून चांगली उद्याची पिढी घडवत आहेत. या सर्वांच्या पाठीशी संस्थेचे पदाधिकारी खंबीरपणे उभे आहेत, असे चित्र समाजात पाहायला दुर्मिळ म्हणावे लागेल. समाजात ज्ञान देणारे खूप आहेत, मात्र विद्वानांची संस्कृती तपासून घ्यावी लागेल. मी साने गुरुजींच्या प्रेमाचा धर्म,मानवता धर्म मानतो आणि जो जे वांचील तो ते लाभो अशी प्रार्थना करतो.
यावेळी टाटा मोटर्स क्वालिटी ग्रुपचे जनरल मॅनेजर आशिष कदम साहेब यांनी शाळेच्या या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले व भविष्यात टाटा मोटर्स कायम या शाळेच्या पाठीशी उभी राहील असे आश्वासित केले. यावेळी सातारा मित्र मंडळाच्या वतीने या उपक्रमासाठी एक लाख रुपये देण्यात आले. या निमित्ताने गुणवंत कामगार व सातारा मित्र मंडळाचे सचिव मा. सोमनाथ कोरे व सामाजिक कार्यकर्त्या सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त सौ. राजश्री पोटे यांचा श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते विशेष गौरव पुरस्कार देऊन शाळेच्या वतीने त्यांना गौरविण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे खजिनदार रामभाऊ खोडदे हे होते. यावेळी शिशुविहार व मॉडर्न नर्सरी शाखानी सुंदर असे प्रकल्प प्रदर्शन भरवले होते.
यावेळी व्यासपीठावर बालाजी मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड चे एम.डी मा. संग्राम पाटील, संस्थेचे कार्याध्यक्ष व नवनिर्वाचित नगरसेवक मा. प्रशांत शितोळे, उज्वला ढोरे,सौ तृप्ती कांबळे,उपाध्यक्ष संजीव वाळके, उपाध्यक्ष सतीश साठे,सचिव तुळशीराम नवले,सातारा मित्र मंडळाचे सदस्य किरण बागल, सुहास गोडसे, सूर्यकांत बरसावडे, पांडुरंग सुतार,प्रकाश चव्हाण, लक्ष्मण शिंदे, मुख्याध्यापिका विद्या ढमाले,सविता माने , सदस्य मनीष पाटील, जयप्रकाश जंगले,प्रकाश ढोरे, शाम धर्मे,विजय सुरवसे दिग्विजय पाटणकर,महेश भागवत, विलास थोरवत,उद्योजक दीपक भोसले इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री शिवाजीराव माने, निवेदन व आभार शिक्षक दत्तात्रय जगताप यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व मराठी,इंग्रजी माध्यमाच्या शिक्षक, सेवक आणि पालक संघ सदस्य, शाळा व्यवस्थापन सदस्य यांनी परिश्रम घेतले. यामध्ये समाजातून पैसे गोळा करण्यासाठी शाळेतील सर्व महिला भगिनींचा मोलाचा वाटा होता खऱ्या अर्थाने त्या सावित्रीच्या लेकी आहेत त्यांच्या या कार्याला मी मुख्याध्यापक या नात्याने सलाम करतो.


GOLDEN PENN

संपादक :  भाग्यश्री बि एम/ Golden Penn

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *