अभिमानाने स्मरण… भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन.
अभिमानाने स्मरण…
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी अभिवादन.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत ७ मे २०१० रोजी पिंपळे निलख–बाणेर जोडणाऱ्या पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ठराव मी स्वतः मांडला आणि मंजूर करवून घेतला.
विरोध, अडथळे, दबाव… कितीही अडचणी येऊ द्या—
बाबासाहेबांच्या नावासाठी मी एक इंचही मागे हटणार नव्हतो.
तत्कालीन पालकमंत्री मा. अजितदादा पवार आणि आयुक्त शर्मा साहेबांशी थेट संवाद साधून, हा अधिकार महानगरपालिकेलाच असल्याचे ठामपणे पटवून दिले आणि विरोधकांचा प्रयत्न साफ हाणून पाडला.
आणि अखेर —
६ डिसेंबर २०१०, महापरिनिर्वाण दिनी पुलावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामफलकाचे अनावरण झाले…
तो क्षण माझ्या आयुष्यातील अभिमानाचा सुवर्णक्षण होता.
बाबासाहेबांचे नाव आता या पुलावर अमिटपणे कोरले गेले आहे.
या संघर्षात सोबत राहिलेल्या पिंपळे निलख, पंचशील नगर व परिसरातील सर्व नागरिकांचे मनःपूर्वक आभार.
आजही या नामकरणाचे सर्व शासकीय पुरावे माझ्याकडे सुरक्षित आहेत—
कारण हा इतिहास केवळ सांगण्यासारखा नाही, तर जपून ठेवण्यासारखा आहे.
आज त्या पुलावर उभा राहून गर्वाने सांगतो —
हे नामकरण मी करून दाखवले.
जय भीम
जय हिंद
जय महाराष्ट्र

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





