अथश्रीला २५ वर्षे पूर्ण; ज्येष्ठ नागरिक निवास क्षेत्रात ६,००० रहिवाशांचा टप्पा
पुणे, महाराष्ट्र | १८ एप्रिल २०२६ — परांजपे स्कीम्स (कन्स्ट्रक्शन) प्रा. लि. या नामांकित विकसकाच्या ‘अथश्री’ या ज्येष्ठ नागरिक निवास उपक्रमाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. भारतातील संघटित ज्येष्ठ नागरिक निवास क्षेत्राच्या घडणीत ‘अथश्री’ने महत्त्वाची भूमिका बजावली असून, सन्मान, स्वावलंबन आणि समुदायाधारित जीवनशैलीवर आधारित हा उपक्रम आज सक्षम मॉडेल म्हणून उभा आहे.
या निमित्ताने वडोदरा येथे ‘अथश्री’च्या ६,००० व्या रहिवाशाला घराचा ताबा देण्याचा सोहळा पार पडला. देशभरात सुमारे १६ वसाहतींमध्ये विस्तारलेल्या ‘अथश्री’त ३,००० हून अधिक ज्येष्ठ नागरिकांना सुविधा दिल्या जात आहेत. कार्यक्रमाची सुरुवात अध्यक्ष श्रीकांत परांजपे यांच्या भाषणाने झाली, तर व्यवस्थापकीय संचालक शशांक परांजपे यांनी ‘अथश्री’च्या प्रवासाचा आढावा घेतला.
या कार्यक्रमात रहिवाशांनी सादर केलेल्या विविध कलाप्रस्तुतींनी समुदायातील उत्साह आणि सक्रिय जीवनशैली अधोरेखित केली. तसेच आरोग्य, वेलनेस आणि समुदाय सहभाग वाढवण्यासाठी नवीन भागीदारी जाहीर करण्यात आल्या. यामध्ये ओपीडी, आयसीयू, आपत्कालीन सेवा, कार्डियाक अॅम्ब्युलन्स, ऑन-कॉल पॅरामेडिक सुविधा तसेच रिअल-टाइम हेल्थ मॉनिटरिंग प्रणालीचा समावेश आहे.
यावेळी ‘अथश्री’मधील उल्लेखनीय योगदान देणाऱ्या रहिवाशांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये डॉ. मोहन फडणीस, पद्मश्री संजय गोविंद धांडे, वीरचक्र सन्मानित विंग कमांडर सुरेश कर्णिक, डॉ. रिता मुल्हेरकर आणि अभिनेत्री वंदना गुप्ते यांचा समावेश होता. या सत्कार सोहळ्याने समुदायातील कर्तृत्व आणि अनुभवाचा गौरव करण्यात आला.
शशांक परांजपे यांनी सांगितले की, ज्येष्ठ नागरिकांसाठी सन्मानाने आणि स्वावलंबीपणे राहता येईल अशी व्यवस्था निर्माण करण्याच्या उद्देशाने सुरू झालेला हा उपक्रम आज हजारो लोकांचा विश्वास जिंकत आहे. बदलती कुटुंबरचना, वाढती आयुर्मर्यादा आणि ‘सिल्वर इकॉनॉमी’मुळे भारतात ज्येष्ठ नागरिक निवास क्षेत्र झपाट्याने विस्तारत असून, ‘अथश्री’सारखे प्रकल्प भविष्यातील दिशा ठरवत आहेत.

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





