सहभाग, शिस्त आणि सामूहिक जबाबदारी — वाहतूक सुरळीततेची खरी गुरुकिल्ली!
सहभाग, शिस्त आणि सामूहिक जबाबदारी — वाहतूक सुरळीततेची खरी गुरुकिल्ली! _श्री सचिन साठे
आपल्या परिसरातील वाढती वाहतूककोंडी ही केवळ प्रशासनाची चूक नाही; अरुंद रस्ते, पूर्वीचे अपुरे नियोजन, वेगाने वाढलेली लोकसंख्या आणि अनियंत्रित नागरीकरण यामुळे आजची परिस्थिती निर्माण झाली आहे. रस्ते ही बदलत्या काळानुसार विकसित न झाल्याची वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही.
याच पार्श्वभूमीवर फक्त प्रशासनाची वाट न पाहता नागरिकांनीही पुढाकार घेणे ही काळाची गरज बनली आहे. या जाणिवेतूनच आमच्या फाउंडेशनतर्फे आणि मित्रपरिवाराच्या सक्रिय सहकार्याने परिसरातील महत्त्वाच्या ठिकाणी ट्रॅफिक वॉर्डन्स नियुक्त करून वाहतूक व्यवस्थापनात छोटासा पण प्रभावी हातभार लावला आहे.
पोलीस विभाग मर्यादित मनुष्यबळात उत्तम काम करत आहे; परंतु त्याचबरोबर नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून आणि शिस्तीने वागून व्यवस्थेला पूरक ठरणे अत्यावश्यक आहे.
समाजकार्यातील असा सहभाग हा फक्त कर्तव्य नसून
🌼 राष्ट्रसेवेचा अत्यंत अर्थपूर्ण मार्ग आहे,
हा माझा ठाम विश्वास.
🪷🪷🪷
— श्री. सचिन मुरलीधर साठे

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





