ग्रामीण आरोग्यासाठी पुढाकार : मैत्री आधार संस्थेची उल्लेखनीय कामगिरी
ग्रामीण आरोग्यासाठी पुढाकार : मैत्री आधार संस्थेची उल्लेखनीय कामगिरी
पिंपळे निलख येथील मैत्री आधार सामाजिक संस्था यांच्या सौजन्याने वरवंड (ता. दौंड) येथे संस्थेच्या २३ व्या सामाजिक उपक्रमांतर्गत भटक्या-विमुक्त जमातीतील १२० मुले-मुलींना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे या हेतूने वॉटर प्युरिफायर व पाण्याची टाकी प्रदान करण्यात आली.
ग्रामीण भागात स्वच्छ पाण्याअभावी उद्भवणाऱ्या आरोग्य समस्या लक्षात घेता, हा उपक्रम अत्यंत मोलाचा ठरतो. या समाजोपयोगी कार्यासाठी एकूण ₹२२,०००/- इतकी समाजसेवा करण्यात आली. शुद्ध पाण्यामुळे बालकांच्या आरोग्यात सुधारणा होऊन आजारांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
या उपक्रमास राजेंद्र टकले, भरत इंगवले, संदीप लक्ष्मण कामठे, बाळासाहेब धरपळे, माऊली मुरकुटे, जयवत रानवडे व सौ. रानवडे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या सातत्यपूर्ण समाजकार्याचे कौतुक करत, भविष्यातही अशाच उपक्रमांना सहकार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला.
मैत्री आधार सामाजिक संस्थेच्या या पुढाकारामुळे ग्रामीण भागातील गरजू बालकांचे आरोग्य, स्वच्छता आणि जीवनमान उंचावण्यास निश्चितच हातभार लागणार आहे.

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





