विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरुळी-आळंदी ग्रामीण गटात राजकीय हालचालींना वेग
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुरुळी-आळंदी ग्रामीण गटात राजकीय हालचालींना वेग
कुरुळी-आळंदी ग्रामीण गटातील जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार विनयाताई सुधीर शेठ मुंगसे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन खेड तालुक्याचे आमदार मा. बाबाजी शेठ काळे यांनी केले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या गटातील राजकीय वातावरण तापले असून प्रचाराला जोरदार गती मिळाली आहे.
यावेळी आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले की, “विनयाताई मुंगसे या विकासाभिमुख नेतृत्व असून ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी त्या सक्षम उमेदवार आहेत. त्यामुळे सर्व मतदारांनी एकजुटीने त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे.”
दरम्यान, केळगाव येथील रघुनाथ महाराज देवस्थानच्या वतीने श्री. प्रकाश शेठ मुंगसे व श्री. सतीश सोनवणे यांनीही सर्व ग्रामस्थांना दिनांक ७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या मतदानात विनयाताई मुंगसे यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे जाहीर आवाहन केले आहे.
या निवडणुकीत कुरुळी-आळंदी ग्रामीण गटात मोठ्या प्रमाणावर मतदान होणार असल्याचे संकेत मिळत असून, स्थानिक विकासासाठी मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
७ फेब्रुवारी २०२६ रोजी होणारे मतदान हे ग्रामीण विकासाच्या दिशेने निर्णायक ठरणार असल्याने मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





