निवडणूक आयोगाच्या चुकांची जबाबदारी फडणवीस टाळणार तरी कशी..?
__ वरीष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी
पुणे, दि. ३ डिसेंबर
राज्यातील निवडणूक प्रक्रियेत सुरू असलेला गोंधळ, विलंब, बदलते निर्णय आणि तांत्रिक तृटी यावरून भाजपची जबाबदारी ठळकपणे पुढे येते, असा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी केला.
तिवारी म्हणाले की—
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीसाठी असलेल्या प्रमुख त्रिसदस्य समितीमधून देशाचे सरन्यायाधीश हटवून, केंद्रीय मंत्री अमित शहांना बसवणे हे निवडणूक आयोगाच्या स्वायत्ततेवरील सर्वात मोठे आघात होते. पंतप्रधान मोदी आणि अमित शहांनी एकहाती आयोगाची रचना केल्यानेच आजच्या चुकांची नैतिक जबाबदारी भाजपपासून दूर जाऊच शकत नाही, असा काँग्रेसचा रोखठोक सवाल आहे.
ते पुढे म्हणाले— सहकार व गृह खात्यात अमित शहांच्या हाताखाली काम केलेले ज्ञानेश्वर कुमार यांची आयोगात निवडही भाजपसाठी ‘अनुकूल वातावरण’ तयार करण्यासाठीच झाल्याचे अनेक निर्णय स्पष्ट करतात.
राज्य निवडणूक आयोगाच्या गोंधळाची मालिका — काँग्रेसचा प्रश्न
- उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरण्याचा अचानक निर्णय
→ जनमत दाबल्यासारखे वातावरण. तांत्रिक अडचणींनंतर परत ऑफलाईन अर्जांवर मागे वळणे! - प्रचाराची वेळ
→ आधी ३० नोव्हेंबर, सायं. ५ वाजेपर्यंत
→ मग अचानक १ डिसेंबर, रात्री १० वाजेपर्यंत वाढ! - अपक्षांना चिन्ह वाटपात अक्षम्य विलंब
→ हा विलंब कोणाला बळ देण्यासाठी? कोणत्या राजकीय समिकरणासाठी? - मतदान तब्बल १८ दिवस पुढे ढकलले
→ उमेदवारांचा वाढीव खर्च कोण देणार? सरकार? आयोग?
तिवारी म्हणाले की, “आयएएस दर्जाची यंत्रणा जाणीवपूर्वक वेड्याचे सोंग घेतेय का? आणि या गोंधळातून सत्ताधाऱ्याला फायदा देण्याचा प्रयत्न केला जातोय का?”
स्थगितीचा निर्णय केला, पण जाहीर करायला उशीर का?
२९ तारखेलाच राज्य निवडणूक आयोगाने काही स्थानिक निवडणूकांचे मतदान व निकाल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
→ मग तो निर्णय जाहीर होण्यासाठी रात्रभर विलंब का?
→ सत्ताधाऱ्यांशी सल्लामसलत होत होती का?
→ परिस्थितीचा राजकीय अंदाज घेत होता का आयोग?
काँग्रेसने हा प्रश्न सर्वप्रथम ३० तारखेच्या रात्रीच अधिकृतपणे उपस्थित केल्याचेही तिवारींनी सांगितले.
“वोट चोरी, बोगस मतदार, दुबार मतदार – हे सर्वप्रथम आम्हीच उघड केले”
काँग्रेसचा कायमचा आरोप आहे की निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या तालावर नाचतोय.
राहुल गांधी यांनी उघडकीस आणलेली बोगस आणि दुबार मतदारांची प्रकरणे याच साखळीचा भाग असल्याचे त्यांनी म्हटले.

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





