अनियमित घंटागाड्यांमुळे उघड्यावर कचऱ्याचा विळखाआरोग्य व स्वच्छतेचा गंभीर प्रश्न — सचिन साठे
अनियमित घंटागाड्यांमुळे उघड्यावर कचऱ्याचा विळखाआरोग्य व स्वच्छतेचा गंभीर प्रश्न — सचिन साठे
पिंपळे निलखसह प्रभागातील विविध भागांत घराघरातून कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्यांच्या अनियमित वेळांमुळे उघड्यावर कचरा साचण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. या बाबत सचिन साठे यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
घंटागाड्या ठराविक वेळेत न येत असल्याने कामानिमित्त सकाळी व संध्याकाळी घराबाहेर असणाऱ्या नागरिकांना योग्य वेळी कचरा देणे शक्य होत नाही. परिणामी काही ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
याबाबत बोलताना सचिन साठे म्हणाले,
“उघड्यावर कचरा टाकणे चुकीचे असून मी त्याचा निषेध करतो. मात्र या समस्येची जबाबदारी केवळ नागरिकांवर टाकणे योग्य नाही. महापालिकेच्या आरोग्य प्रशासनाने घंटागाड्यांचे वेळापत्रक शिस्तबद्ध व नियमित करणे अत्यावश्यक आहे.”
उघड्यावर पडलेला कचरा जनावरांकडून अधिक अस्ताव्यस्त होत असून परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे डास, माश्यांचा प्रादुर्भाव वाढून रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. स्वच्छता, आरोग्य व पर्यावरणाच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
“या विषयाकडे तातडीने लक्ष देऊन प्रभावी नियोजन करणे गरजेचे आहे. येणाऱ्या काळात नागरिक व प्रशासन यांनी समन्वयाने काम केल्यासच ही समस्या सुटू शकते,” असे आवाहनही सचिन साठे यांनी केले आहे.

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





