प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा समजून, गरजांना केंद्रस्थानी ठेवून प्रभागाचा भविष्यकालीन नकाशा सुयोजित करणं—हेच माझं ध्येय.” — सचिन साठे
प्रत्येक नागरिकाच्या अपेक्षा समजून, गरजांना केंद्रस्थानी ठेवून प्रभागाचा भविष्यकालीन नकाशा सुयोजित करणं—हेच माझं ध्येय.” — सचिन साठे
पुणे व पिंपरी-चिंचवडला जोडणारा महत्त्वाचा भौगोलिक सेतू, संरक्षण विभागाची जवळीक आणि मुंबई–बंगळोर महामार्गालगत असलेलं रणनीतिक स्थान यामुळे प्रभाग क्र. २६ शहराच्या विकासदृष्टीने वेगाने उभरत आहे. नागरिकांचे वाढते स्थलांतर, रोजगाराच्या संधी, व्यवसायाची वाढ आणि आयटी–औद्योगिक क्षेत्रांशी जोडलेली सुटसुटीत वाहतूक व्यवस्था यामुळे हा प्रभाग आज सर्वाधिक पसंतीचा बनला आहे.
हिंजवडी आयटी पार्क, ऑटोमोबाईल क्षेत्र, चाकण–भोसरी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या हजारो नागरिकांचे हे केंद्रबिंदू ठरत आहे. सुरक्षित परिसर, वेगाने वाढणारी पायाभूत सुविधा आणि सर्व स्तरातील नागरिकांचे स्नेहपूर्ण सहजीवन—या सर्व गोष्टी प्रभाग क्र. २६ ची ‘ओळख’ बनल्या आहेत.
आगामी २५ वर्षांच्या दृष्टीने होणाऱ्या प्रचंड निवासी व व्यावसायिक विस्ताराचा विचार करून, पाणीपुरवठा, आरोग्यसेवा, दर्जेदार शिक्षण, हिरवळ निर्माण, उद्यानं, सुसज्ज भाजी मंडई आणि मोकळ्या सार्वजनिक जागांचे सुयोग्य नियोजन गरजेचे असल्याचे सचिन साठे यांनी त्यांच्या पॉडकास्ट संवादात स्पष्ट केले.
त्यांनी सांगितले की, प्रभागाचा विकास हा केवळ इमारतींचा वाढता पल्ला नसून;
तो नागरिकांच्या गरजांवर आधारित, संतुलित, शाश्वत आणि सर्वसमावेशक असला पाहिजे.
प्रभागाच्या भौगोलिक महत्त्वाला चालना देत, वाढत्या वाहतूक दडपणाला समतोल उपाययोजना, सार्वजनिक सुविधांची गुणवत्ता, नव्या पिढीसाठी सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण आणि सर्व नागरिकांना समान न्याय देणारा विकास—हे त्यांच्या कामाचा मुख्य केंद्रबिंदू असेल, असे त्यांनी स्पष्टपणे मांडले.
प्रभाग क्र. २६ चा विकासनकाशा ‘भविष्यकालीन आणि नागरिककेंद्री’ असावा—हीच सचिन साठेंची भूमिका.

संपादक : भाग्यश्री बि एम/ Golden Penn





